शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
3
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
4
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
5
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
8
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
9
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
10
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
11
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
12
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
13
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
14
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
15
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
16
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
17
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
18
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
19
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
20
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
Daily Top 2Weekly Top 5

डाळिंब पीक विम्यास तलाठी दाखल्याने खोडा- आॅनलाईन अडथळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2018 00:50 IST

प्रधानमंत्री कृषी विमा योजनेअंतर्गत डाळिंब फळासाठी विमा कंपन्यांनी विमा भरण्यासाठी गावकामगार तलाठी दाखल्याची अट घातली आहे. न्यायालयाच्या आदेशामुळे तलाठ्यांना कोणतेही

ठळक मुद्दे : न्यायालयाच्या आदेशामुळे तलाठ्यांना दाखले देण्यास निर्बंध-शासनानेच तोडगा काढण्याची गरज

गजानन पाटील ।संख : प्रधानमंत्री कृषी विमा योजनेअंतर्गत डाळिंब फळासाठी विमा कंपन्यांनी विमा भरण्यासाठी गावकामगार तलाठी दाखल्याची अट घातली आहे. न्यायालयाच्या आदेशामुळे तलाठ्यांना कोणतेही दाखले देता येत नाहीत. त्यामुळे फळ बागायतदार शेतकऱ्यांना विमा भरण्यास अडचणी आल्या आहेत. डाळिंब नोंदीचे उतारे मिळविण्यासाठी आॅनलाईन नोंदी करून उतारे आणावे लागत आहेत. आॅनलाईन नोंद वेळखाऊ आहे. तलाठी दाखल्याच्या अटीमुळे डाळिंब विमा भरण्यास खोडा बसला आहे. अनेक शेतकºयांना डाळिंब पीक विम्यापासून वंचित राहावे लागणार आहे.

कृषी क्षेत्राच्या उत्पादन वाढीच्या दरामध्ये फळ पिकांचा प्रमुख सहभाग आहे. फळ पिकांचे बाजारमूल्य अधिक असल्याने शेतकºयांना चांगले उत्पन्न मिळते. मात्र फळ पिकाचे अपेक्षित उत्पन्न न आल्यास तोटाही मोठा असतो. ही बाब विचारात घेऊन शेतकºयांच्या फळ पिकांना हवामान धोक्यापासून विमा संरक्षण दिल्यास शेतकºयांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखण्याच्यादृष्टीने मदत होईल. ही बाब विचारात घेऊन फळपिकांना हवामान धोक्यापासून विमा संरक्षण देण्यासाठी प्रधानमंत्री फसल विमा योजना राबविली जात आहे. डाळिंब फळबागेसाठी १४ जुलै ही सहभागी होण्यास मुदत होती.

सांगली, सातारा, सोलापूर, अकोला, जालना, बुलडाणा, बीड, पुणे, वर्धा, नागपूर या जिल्ह्यातील डाळिंब फळबागांसाठी टाटा ए आय जी इन्शुरन्स कंपनीकडून विमा दिला जाणार आहे. तालुक्यामध्ये डाळिंब क्षेत्र १२ हजार ३४४.५९ हेक्टर आहे. उजाड अशा माळरानावर बागा फुलवल्या आहेत. आर्थिक फायदाही चांगला आहे.

विमा कंपन्यांनी विविध कागदपत्रांसह डाळिंब लागवडीच्या तलाठी दाखल्याची अट घातली आहे. दुसºया बाजूला तलाठ्यांना दाखले देण्यास न्यायालयाने मनाई केली आहे. त्यामुळे डाळिंब लागवडीचे दाखले मिळत नसल्यामुळे शेतकºयांचा विमा बॅँका भरून घेत नाहीत. उताºयावरील लागवडीवर शंका उपस्थित केल्या जातात. बॅँका तलाठ्याचाच दाखला मागत आहेत. कृषी सहायक किंवा कृषी अधिकाºयाचे दाखले स्वीकारले जात नाहीत. अलीकडे नवीन लागण केलेल्या डाळिंबाची उताºयावर नोंद नाही. त्यामुळे अशा शेतकºयांवर डाळिंब विमा भरण्यापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.विम्यासाठी विमा फॉर्म, ७/१२ उतारा, खाते उतारा, लागवडीचा दाखला, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र झेरॉक्स, बॅँक पासबुक, तलाठ्याचा दाखला, स्वयंघोषित पत्र ही कागदपत्रे आवश्यक आहेत.बँकांकडूनही असहकार्य : शेतकरी नाराजजळीत पीक विमा भरण्यासाठी बँकेकडूनही शेतकºयांना सहकार्य मिळत नाही. जिल्हा मध्यवर्ती बॅँकेमध्ये शेतकरी हेलपाटे मारत आहेत. दरीबडची येथे अजूनही विमा भरण्यास सुरुवात झालेली नव्हती.

डाळिंब फळपीक दृष्टिक्षेप...लागवडीचे क्षेत्र- १२ हजार ३४४.५९ हेक्टरहेक्टरी विमा रक्कम - ६०५० रुपयेएकूण विमा संरक्षित रक्कम (प्रति हेक्टर) - १ लाख २१ हजार

 

डाळिंब लागवडीच्या दाखल्याची अट शिथिल करून शेतकºयांना विमा भरण्यास मुभा द्यावी, तरच शेतकºयांना लाभ मिळेल. शासनाने यामध्ये लक्ष घालून दाखल्याची अट शिथिल न केल्यास जत, आटपाडी, कवठेमहांकाळ दुष्काळी भागातील शेतकºयांचे फार मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे.- विक्रम ढोणे